वाड्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु

गावदेवी मित्रमंडळ मोहोट्याचापाडा यांच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

    16-Sep-2023
Total Views | 44

ganpati1

वाडा :
तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव-पाड्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीचे देखावे तयार करण्यासाठी मेहनत करतांना दिसत आहेत. मंगळवार (ता.१९) रोजी गणेश चतुर्थी असून ग्रामीण भागात गणेशोगणेशोत्वानिमीत्त जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावदेवी मित्रमंडळ मोहोट्याचापाडा येथे गणेशोत्सवानिमीत्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे १० दिवस आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवार दि १९ रोजी गणेशोत्सवाच्या पहील्या दिवशी मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात येईल,शुक्रवार दि.२२ रोजी पळसपाडा येथील वारकरी संप्रदायाचे हरिपाठाचे आयोजन करण्यात आला आहे.रविवार दि.२४ रोजी महिलांचे हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवार दि. २५ रोजी जिजाऊ भजन मंडल आनगाव श्रृती जाधव यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम, मंगळवार दि २६ रोजी शिवव्याख्याती देवयानी घरत यांचे शिवव्याख्यान व लहान मुलांच्या नृत्य स्पर्धा, बुधवार दि. २७ रोजी महाप्रसाद व गरबा नृत्याचा कार्यक्रम, गुरुवार दि.२८ रोजी भव्य मिरवणूक व विसर्जन सोहळा होणार आहे.

गावदेवी मित्रमंडळ मोहोट्याचापाडा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे गणरायाची १० दिवसांची स्थपना करण्यात आठली असून या दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121