मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा, अशी मागणी ही करण्यात येत आहे.
शिवाय चाकरमान्यांचा हवाईप्रवासही बिकट होणार आहे. कोकण रेल्वेनंतर दुसरा पर्याय म्हणजे हवाईप्रवास. पण, गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर विमानाच्या तिकिटांचा दर हा सर्वसामान्य कोकणी माणसाला परवडणारा नाही. हवाईप्रवासाचे तिकीटदर तिप्पट झाले आहेत.