माझा छळ केला गेलायं : शंभर कोटी वसुली प्रकरणातील आरोपी अनिल देशमुख

    23-May-2023
Total Views | 168
Anil Deshmukh

मुंबई
: माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. असे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. माझ्यावर खोटा आरोप करण्यात आला. माझा छळ झाला. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये खोटे आरोप करून चौकशी सुरू करण्याचा हा उद्योग देशात सुरू आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहोत.

तसेच देशमुख म्हणाले की, 'राजकारणात विरोध असतो. मात्र, एजन्सीचा गैरवापर करून काही लोकांना चौकशीसाठी बोलावून तुरुंगात टाकले जाते. राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे हे दुर्दैव आहे. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करताना त्यात केवळ १ कोटी ७२ लाखांचा उल्लेख होता,असे देशमुख म्हणाले.

दरम्यान विरोधकांवर खोटे आरोप करून तपास सुरू करण्याचा उद्योग राज्यात सुरू आहे. संजय राऊत यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. आता जयंत पाटील यांची अडचण सुरू झाली आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदने दिली आहेत, असे विधान अनिल देशमुखांनी केले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121