आप्पापाडा दुर्घटनाबाधित विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची मोठी घोषणा!

    30-Mar-2023
Total Views | 115
Appapada Disaster


मुंबई : आप्पापाड्यातील दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी छात्रभारतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने मदतीचे परिपत्रक आज जारी केले आहे. आगीमुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके जळून गेलीत, परीक्षेच्या तोंडावर कुठलेही स्टडी मटेरियल त्यांच्याजवळ राहिलेले नाही म्हणून छात्रभारतीच्या वतीने मागण्यांचे निवेदन मा.कुलगुरुंना देण्यात आले होते त्यावर विचार करुन आज विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आयडी कार्ड फी व तत्सम सर्व शुल्क माफीचे, पुस्तकपेढीतून पुस्तक उपलब्ध करण्याचे व सर्व जळालेली शैक्षणिक कागदपत्रे विनामुल्य देण्याचे नमुद केले आहे.

आप्पा पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मागच्या १५ दिवसांपासून छात्रभारती सातत्याने पाठपुरावा करत आहे. अखेर ठिय्या आंदोलनानंतर विद्यापीठाला जाग आली व त्यांनी परिपत्रक जारी केले असे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. तद्प्रसंगी राज्याध्यक्ष रोहित ढाले, संघटक सचिन बनसोडे, मुंबई अध्यक्ष विकास पटेकर, निकेत वाळके, भवानजी कांबळे, आशिष जाधव, प्रदिप मिसाळ, वैभव गाडेकर, विशाल कदम हे उपस्थित होते.


अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

मोठी बातमी! देशात

मोठी बातमी! देशात 'या' तारखेपासून होणार जनगणनेला सुरुवात, पहिल्यांदाच जातनिहाय नोंदी होणार

(Caste census) भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात केली जाणार आहे. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल. जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय नोंद होणार आहे. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातनिहाय नोंदीसाठी कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121