२ वर्षानंतर भरले ज. जी. कला महाविद्यालयाचे वार्षिक चित्र शल्प प्रदर्शन

    16-Mar-2023
Total Views | 99

jj art 
 
मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन भरले आहे. ख्यातनाम कलावंत दिलीप रानडे यांच्या हस्ते दि. १४ मार्च रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी माजी प्राध्यापक उदय घरात तसेच ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यादेखील उपस्थित होत्या. दि. १५ मार्च पासून २१ मार्च, मंगळवारपर्यंत सकाळी १०:३० पासून संध्याकाळी ६:३० पर्यंत हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले करण्यात आलेले आहे.
 
या प्रदर्शनात जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण ५ विभागातील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या होत्या. चित्रकला, शिल्पकला/मूर्तिकला, धातू काम, वस्त्र कला व सिरॅमिक अशा ५ विभागातील विद्यार्थ्यांनी आपापली कला उत्कृष्टपणे सादर केली होती.
 
विद्यार्थ्यांची वर्कमनशिप उत्तम आहे. काम करण्यासाठीचे सातत्य त्यांच्यात आहे. रंगमाध्यमे म्हणजे तेल रंग, ऍक्रिलिक रंग यांना त्या त्या कलाकृतीच्या प्रकृतीनुसार वापरण्यात आलेलं आहे. ते पाहून आनंद वाटतो. यावर्षी थीम ओरिएंटेड कलाकृती साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीतून काही संदेश दिलेला आहे. कोरोना काळात २ वर्ष प्रदर्शन न झाल्याने विद्यार्थी अगदी अधाशासारखे पेटून उठलेत. हे त्यांच्या कामातून दिसतंय.
- डॉ. गजानन शेपाल.
प्राध्यापक, कला चिकित्सक \ समीक्षक
Honorable Members – Global Scholars Foundation 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121