चाकरमान्यांची चिंता मिटली! आता कन्फर्म तिकीट मिळणारच!

    17-Nov-2023
Total Views | 459
 
Indian Railways
 
 
मुंबई : कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना कायमच कन्फर्म तिकीट मिळण्याबाबत चिंता असायची. मात्र, आता ही चिंता मिटणार आहे. आतापासून चार वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या ताफ्यात तीन हजार नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
 
सनासुदीच्या काळात ट्रेनला प्रचंड गर्दी असते. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. कन्फर्म तिकीट मिळणे जवळपास अशक्यच असते. सध्या दररोज १०७४८ ट्रेन धावत आहेत. हा आकडा १३००० गाड्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. रेल्वे दरवर्षी ट्रॅक वाढवत आहे. आता ४ ते ५ हजार किलोमीटर ट्रॅकचे नवीन जाळे तयार करण्यात आले आहे. पुढील ३-४ वर्षात आणखी ३००० नवीन गाड्या रुळावर आणण्याची योजना आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121