पीएफ खात्यासाठी फोन आला असेल तर सावधान! वृद्ध दाम्पत्याला ४ कोटींनी गंडवले

    26-Oct-2023
Total Views | 72

Cyber Crime


मुंबई :
राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
 
एका मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या दक्षिण मुंबईतील एका वृद्ध जोडप्याचा एका कंपनीशी संपर्क आला. या कंपनीतील महिलेने त्यांना पीएफ विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिचे पती काम करत असलेल्या कंपनीचे नावही आरोपी महिलेने तिला सांगितले.
 
त्यानंतर आरोपी महिलेने वृद्ध महिलेला सांगितले की, तिच्या पतीने भविष्य निर्वाह निधीमध्ये ४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ते आता २० वर्षानंतर परिपक्व झाले असून तुम्हाला ११ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच तिने यासाठी टीडीएस, जीएसटी आणि आयकर भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
 
महिलेने आरोपीला बँकेचे तपशील देताच आरोपीने तब्बल चार कोटी रुपये लुबाडले. त्यानंतर या वृद्ध जोडप्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121