कॉलेजियम व्यवस्थेचे पालन झालेच पाहिजे – सर्वोच्च न्यायालय

    08-Dec-2022
Total Views | 73
 
Supreme Court
 
 
 
 
नवी दिल्ली : समाजातील काही वर्ग कॉलेजियम व्यवस्थेविरोधात मत व्यक्त करतात म्हणून तो कायदा बंद होणार नाही. या कायद्याचे पालन झालेच पाहिजे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्या. अभय. एस. ओक आणि न्या. विक्रमनाथ यांच्या खंडपीठासमोर बंगळुरूच्या अॅडव्होकेट्स असोसिएशनने न्यायालयीन नियुक्तीच्या मुदतीचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्राविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
 
सुनावणीवेळी न्यायालयाने अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांना सांगितले की, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली तयार करणाऱ्या घटनापीठाच्या निर्णयांचे पालन केले पाहिजे. केंद्र सरकारतर्फे काही न्यायाधीशांच्या कॉलेजियम व्यवस्थेविरोधातील मतांचा वापर कॉलेजियमने केलेल्या शिफारशींना मंजुरी न देण्यासाठी केला जात आहे. संसदेने तयार केलेल्या कायद्यांशी सहमत नसलेला एक वर्ग समाजात आहे. त्या आधारावर न्यायालयाने अशा कायद्यांची अंमलबजावणी थांबवावी का, असा सवाल न्यायलयाने विचारला. कोणता कायदे पाळण्याविषयी समाजातील प्रत्येकाने निर्णय घेण्यास प्रारंभ केला तर अव्यवस्था निर्माण होईल, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
 
सध्या न्यायाधिशांच्या नियुक्त्यांची कॉलेजियम व्यवस्था आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोग हे मुद्दे ऐरणीवर आले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याविषयी रोखठोक मते व्यक्त केली आहे. त्यामुळे कॉलेजियम व्यवस्थेवरून केंद्र सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालय असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121