ऑलिम्पिकमध्ये भारतीय 'भवानी'ची चर्चा ; केला आहे अनोखा विक्रम

    26-Jul-2021
Total Views | 136

Bhavani Devi_1  
 
टोकियो : सध्या भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२१ या स्पर्धेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी भारताच्या एका खेळाडूचा पराभव होऊनही तिच्या कामगिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे ऑलिम्पक स्पर्धेत तलवारबाजीमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरलेली 'भवानी देवी'. पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या भवानीने पहिली लढत जिंकली, पण दुसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला. तरीही, तिच्या या कामगिरीमुळे देशावासियांकडून कौतुक होत आहे.
 
 
 
भवानीने पहिल्या लढतीमध्ये ट्युनेशियाच्या नादिया बेनचा १५-३ असा पराभव करत एक दमदार विजय मिळवला. या सामन्यात तिने पहिल्या ३ मिनिटातच ८-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ६ मिनिट १४ सेकंदात तिने ही लढत १५-३ अशी जिंकली. पुढे तिचा सामना फ्रान्सच्या ब्रुनेटशी झाला. या सामन्यात तिने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रुनेटला चांगलीच टक्कर दिली. मात्र, अखेर तिला या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. तिला ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले असले तरीही तिच्या या अनोख्या कामगिरीने भारतीयांची मने जिंकली आहेत.
 
 
 
 
 
 
 
यानंतर तिने एक ट्विट करत देशवासीयांची माफिदेखील मागितली. तिने यामध्ये म्हंटले आहे की, " हा अनुभव खूप उत्साहित आणि भावूक होता. मी नादियाविरुद्धच्या सामना १५-३ अशा फरकाने जिंकत ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरले. पण दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मॅनॉन ब्रुनेटकडून ७-१५ ने मी पराभूत झाले. पण मी माझे सर्वश्रेष्ठ दिले असले, तरी देखील मी जिंकू शकले नाही. मला माफ करा."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121