कोकण किनारपट्टीवर समु्द्री कासवांचा जन्मोत्सव; या किनाऱ्यांवर जन्मास आली पिल्ले

    06-Mar-2021
Total Views | 321
sea turtle_1  H

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. ही पिल्लं वाळूतून मार्गक्रमण करत समुद्रात रवाना होत आहेत. या आठवड्यात दिवेआगर, श्रीवर्धन, वेळास, मुरूड आणि वायंगणीच्या किनाऱ्यावरुन समुद्री कासवाच्या ३५० हून अधिक पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.
 
 
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये 'आॅलिव्ह रिडले' या प्रजातीच्या माद्यांचा समावेश असतो. रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदाच्या या हंगामात किनाऱ्यावर आढळलेली अंडी कासवमित्रांकडून संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून आता पिल्ल बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
 
 
यंदाच्या हंगाातील कासवाचे पहिले घरटे रायगड जिल्ह्यात आढळले होते. त्यामुळे याठिकाणी संरक्षित केलेल्या अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. दिवेआगरमधून १०३ आणि हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावरुन कासवाची १०० पिल्ले समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. रत्नागिरीतील वेळासच्या किनाऱ्यावरुन ४२ आणि मुरूडमधून ४६ पिल्लांना समुद्रात सोडल्याचे दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले. तर सिंधुदुर्गच्या वायंगणी किनाऱ्यावरुन साधारण ८७ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. येत्या काळात या संख्येत वाढ होणार असून श्रीवर्धन,मारळ, केळशी, आंजर्ले, गावखडी, कोळथरे, दाभोळ, तांबळडेक, शिरोडा इ. किनाऱ्यांवरुन कासवाची पिल्ले समुद्रात रवाना होतील.


कासव उपचार केंद्रास मान्यता
सिंधुदुर्गातील तोंडवली किनाऱ्यानजीक बांधण्यात येणारे समुद्री कासव उपचार केंद्राला 'सागरी नियमन क्षेत्रा'ची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीस हे उपचार केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करुन या केंद्राचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. १,९२५ चौरस फूट जागेवर हे केंद्र बांधण्यात येणार असून त्यामध्ये शस्त्रक्रिया विभाग आणि ३० कासवांना ठेवण्याची सुविधा असेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर आता

ऑपरेशन सिंदूरनंतर आता 'ऑपरेशन पुशबॅक'ने उडवली बांगलादेशची झोप!

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..

गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121