सचिन वाझे प्रकरणी एटीएसही अॅक्शनमध्ये!

    19-Mar-2021
Total Views | 89
Sachin_1  H x W



(मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत आहे. अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात आता पुण्याहून आलेली फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम एनआयए ऑफिसमध्ये दाखल झाली आहे.)




ठाणे :
वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन मिळू नये. यासाठी एटीएसने शुक्रवारी (दि.१९ मार्च) ठाणे न्यायालयात चारपानी पत्र सादर केले असून एटीएस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांचा मनसुख हिरन यांच्या हत्ये प्रकरणात किती सहभाग आहे आणि त्याबाबत तपासात काय समोर आले आले हे या ४ पानी पत्रात एटीएसने नमुद केले आहे.
 
 
दरम्यान, एटीएसने सादर केलेल्या या पत्रावर आपल्याला अभ्यास करायचा असून त्याकरता वेळ पाहिजे असा युक्तीवाद सचिन वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अटकपुर्व जामिनावर पुढील सुनावणी ३० मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. याविषयी सचिन वाझे यांच्या वकीलांनी माध्यमांशी संवाद साधताना ख्वाजा युनूस प्रकरणातही त्यांना अडकवण्यात आले होते आताही गोवले जात आहे, असा आरोप केला आहे.
 
 
तेव्हा,अद्याप वाझे यांच्याशी बोलणे झाले नसुन येत्या काही दिवसात त्यांच्याशी बोलून मगच ३० मार्च रोजी उत्तर देईन, असे स्पष्ट केले. दरम्यान, वाझे यांच्या बहिणीने इंटरव्हीजन याचिका दाखल केली आहे, मीडियावाले त्रास देतात, घरी येतात, त्यामुळे कोर्टाने राबोडी पोलिसांना यासंदर्भात लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.






अग्रलेख
जरुर वाचा
पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल!

पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल! 'या' स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो

(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या..

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

मराठी मनांसाठी विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन खुले करुन देणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी रोजी पुण्याच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार निद्रीस्त असतानाच अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ मराठी साहित्यच नव्हे तर सबंध विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वैज्ञनिक, साहित्यिक तसेच शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी तारा मावळला अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121