मुंबईवर आस्मानी संकट : मालाडमधील मृतांचा आकडा १९ वर

    02-Jul-2019
Total Views | 40




मालाड : मालाडमध्ये पिंपरीपाडा भागात झोपड्यांवर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १९ जण ठार झाले आहेत. जखमींचा आकडा ५० वर पोहोचला आहे. इतर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केली आहे. मंत्री योगेश सागरही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढीगाऱ्या खाली किती जण दबले आहेत, याचा नेमका आकडा अजून कळलेला नाही. 



 

 

दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून बचावकार्यात पावसामुळे अडथळे येत आहेत. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.



 

 

दुर्दैवाची बाब म्हणजे एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली आढळली. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121