सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रथमच हिंदू धर्मातील सर्व जातींचा एकत्रित वधू-वर मेळावा

अखिल भारतीय कोकण विकास महासंघाचे आयोजन

    05-Apr-2025
Total Views | 20
 
Vadhu Var Melava
 
मुंबई : अखिल भारतीय कोकण विकास महासंघाच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रथमच वधू-वर सूचक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक, १३ एप्रिल रोजी कुडाळ येथील स्व. बापूसाहेब महाराज सभागहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
हिंदू धर्मातील सर्व जातींचा एकत्रित असा हा वधु-वर मेळावा आहे. याप्रसंगी खासदार नारायण राणे, खासदार रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  भाजप एका विधानसभेत नेमणार ३ मंडल अध्यक्ष
 
या वधु-वर मेळाव्यासाठी ३०० रुपये इतके शुल्क असून वधु-वरा सोबत येणाऱ्या एका व्यक्तीला प्रवेश मोफत असेल. यावेळी सर्व विवाह इच्छुक वधु-वरांनी जन्मपत्रिका आणि पोस्टकार्ड साईड फोटो घेऊन येणे आवश्यक आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121