शिवडी-वरळी प्रवास १० ते १५ मिनिटांत

एमएमआरडीएकडून शिवडी- वरळी जोडरस्ता प्रकल्प उभारणीला वेग

    06-Feb-2025
Total Views | 33

shiwree worli
मुंबई,दि.६ : विशेष प्रतिनिधी शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या पुलाच्या कमला गती देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.

शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर उभारणे आणि एल्फिन्स्टन पुलाची उंची आणि रुंदी वाढविण्यासाठी हा पूल तोडण्यात येणार आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर येथे रेल्वे रुळांवर डबलडेकर पूल असेल. अटल सेतूच्या १५ टक्के वाहन वाहतुकीसाठी हा कनेक्टर वापरला जाईल, असा अंदाज आहे. या कनेक्टरमध्ये चार लेन असतील. शिवडी-वरळी उन्नत कनेक्टरचे काम वेगाने सुरू आहे.
मध्य आणि दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या नवी मुंबईतील प्रवाशांना सिग्नलमुक्त, वेळेची बचत करणाऱ्या मार्गाचा फायदा होईल. वांद्रे-वरळी आणि मुंबई कोस्टल रोडवरून अटल सेतूपर्यंत सुमारे १५ ते २० टक्के वाहनांना वळविणे शक्य होईल. यातूनच अटल सेतूवरील टोल महसूल वाढेल. सध्याची या प्रकल्पाची ६०% काम पूर्ण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करताना रेल्वे रुळांवर ३००० मेट्रिक टन वजनाचा गर्डर उभारणे या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांबद्दल नाही - तो जीवनाशी जोडणारा, प्रवासाच्या वेळा कमी करणे आणि मुंबईचे वाहतूक नेटवर्क पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम बनवणारा असेल, अशी खात्री एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
हा माझा पुनर्जन्मच...; विमान दुर्घटनेतून बचावलेल्या भूमी चौहानने सांगितला अनुभव

"हा माझा पुनर्जन्मच..."; विमान दुर्घटनेतून बचावलेल्या भूमी चौहानने सांगितला अनुभव

(Bhumi Chauhan) गुजरातमधील भरूचमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातून सुदैवाने वाचली आहे. कारण भूमीला विमानतळावर पोहोचण्यास दहा मिनिटे उशिर झाला होता. त्यामुळे भूमीची फ्लाईट मिस झाली अन् सुदैवाने तिचा जीव वाचला. भूमीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ती अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने प्रवास करणार होती. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ती सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दहा मिनिटे उशिरा पोहोचली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विमानतळावर तिला एन्ट्री ..

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121