वरळी बीडीडीतील ५५६ घरांचे २ आठवड्यात हस्तांतरण बीडीडी चाळ, पत्राचाळ व वसाहतींच्या पुनर्विकासाला गती , म्हाडाच्या सुधारणांचा नवा आराखडा

Total Views | 12


मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील विविध वसाहती व प्रकल्पांचा प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी वरळी बीडीडी चाळीत ९८६९ पुनर्वसन सदनिकांपैकी ३८८८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी ५५६ सदनिकांचे हस्तांतरण येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. १४१९ सदनिका सप्टेंबर २०२५ पर्यंत आणि १६४२ सदनिका ऑगस्ट २०२७ पर्यंत हस्तांतरित होणार आहेत,अशी माहिती देण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे गुरुवार, दि.१२ रोजी म्हाडाच्या विविध प्रकल्पांच्या आणि अधिनियमांतील सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याचा तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण शिबिरासाठी किंवा सोडतीद्वारे विक्रीसाठी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. विनिमय 33(4), 33(5), 33(7), 33(9) आणि 33(24) अंतर्गत सुचवलेल्या सुधारणांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

वरळी बीडीडी चाळीत ९८६९ पुनर्वसन सदनिकांपैकी ३८८८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी ५५६ सदनिकांचे हस्तांतरण येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. १४१९ सदनिका सप्टेंबर २०२५ पर्यंत आणि १६४२ सदनिका ऑगस्ट २०२७ पर्यंत हस्तांतरित होणार आहेत. नायगाव बीडीडी प्रकल्पात ३३४४ पैकी १९३८ सदनिकांचे काम सुरू असून त्यातील ८६४ सदनिका सप्टेंबर २०२५ मध्ये देण्यात येणार आहेत. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत १२४१ सदनिकांचे काम सुरु असून त्यातील ३४२ सदनिका डिसेंबर २०२५ पर्यंत हस्तांतरीत होणार आहेत. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ ६७२ सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले असून १२४३ नवीन सदनिकांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.

तसेच, सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहती, आराम नगर, मोतीलाल नगर, अभुदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, पीएमजीपी वसाहत, पूनम नगर आणि मुंबई महानगर ग्रोथ हब या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हाडाने अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित व योग्य सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121