शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपायोजना करा!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेला निर्देश

    03-Feb-2025
Total Views | 57
 
Image
 
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिवाजी पार्क रहिवाशी संघाशी चर्चा केली. तसेच महानगरपालिकेकडून वेळोवेळी या उपायोजनांची माहिती घेतली जाईल आणि त्यावर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल असा विश्वास त्यांनी दिला.
 
मुंबई महानगरपालिकेने मैदानाची देखभाल करण्यासाठी एका तज्ञ व्यक्तीची निवड करावी. मैदानातील मातीचा दर्जा तपासून पुढील महिन्याभरात त्यावर परीक्षण करून मातीला घट्ट धरून बसतील अशा योग्य त्या गवताची निवड करावी. तसेच पावसाळ्यापूर्वी या गवताची लागवड करावी. गरज भासल्यास मैदानाच्या शेजारून जाणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिनीच्या पाण्यावर याच मैदानातील योग्य ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारावी आणि त्या पाण्याचा वापर गवताच्या वाढीसाठी तसेच मैदानाची निगा राखण्यासाठी करावा," असे निर्देष महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिले आहेत.
 
तसेच एप्रिल २०२५ अखेरपर्यंत महानगरपालिकेने याबाबत उपायोजना केल्या जाणार असल्याचा अहवाल आणि त्याचे वेळापत्रक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर करावे. त्याचबरोबर शिवाजी पार्कच्या चहुबाजूने योग्य झाडांची लागवड करावी आणि मैदानावरील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात या मैदानावर खड्डे पाडले जाणार नाहीत असे निर्देश संबंधित आयोजक संस्थेला वेळोवेळी द्यावेत. याशिवाय शिवाजी पार्क रहिवासी संकुल आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या संस्थांना महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती द्यावी, असेही निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला देण्यात आले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121