संभल सर्वेक्षमादरम्यान विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा होता कट
चौकशीदरम्यान आरोपीचा कबुलीजबाब
21-Feb-2025
Total Views | 36
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (conspiracy to kill vishnu shankar jain) उत्तर प्रदेशात संभळ हिंसाचार प्रकरण चांगलेच गाजले होते. नोव्हेंबर महिन्यात येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर बहुतांश लोक जखमी झाले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत संभल हिंसाचारात सामील असलेल्या अनेक आरोपींना अटक केली, त्यापैकी एका आरोपीने नुकत्याच दिलेल्या कबुलीजबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संभलमधील हिंसाचाराच्या वेळी हिंदू पक्षाच्या बाजूने लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे आरोपीने कबुल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाम याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो शारिक साटा नावाच्या व्यक्तीसाठी काम करतो आणि शस्त्रांची तस्करीदेखील करतो. शारिक साटा सध्या दुबईत असून त्याच्याच बळावर विष्णू शंकर जैन यांच्या हत्येची संपूर्ण योजना आखण्यात आली होती. तेव्हा विष्णू शंकर जैन यांचा फोटोही दाखवण्यात आला जेणेकरून संधी मिळताच त्यांना मारता येईल. शारिक साटा यांच्या टोळीला पूर्वी राजकीय संरक्षण होते, त्यामुळे ते संभलच्या दीपा सराईत काम करायचे. परंतु आता कडक पोलीस बंदोबस्तामुळे काम करणे कठीण झाले असल्याचे आरोपीने म्हटले आहे.
आरोपी गुलाम याने पुढे असेही सांगितले की, 'संसद संभळ' नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. त्यात सर्वेक्षणाच्या दिवशी मोठ्या संख्येने जमावाला एकत्र येण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा ग्रुपवर चर्चा झाली. गुलामसोबत शारिक अशा एका ॲपच्या माध्यमातून संपर्कात होता ज्या ॲपमध्ये डेटा साठवला जात नाही. एका स्थानिक व्यक्तीने शारिकला मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सांगितले होते, त्यानंतर गुलामसह शारिकने विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा कट रचला होता. सर्वेक्षणादरम्यान विष्णू शंकर जैन आणि पोलिसांनी गोळीबार करून ठार मारावे. यामुळे हिंसाचार भडकेल आणि शस्त्रास्त्रांची तस्करी पुन्हा सुरू होईल, असा खुलासा आरोपी गुलामने केला आहे.