महाकुंभ दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

    29-Jan-2025
Total Views | 34
PM Modi About Mahakumbh Accident

लखनौ
: प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली. यामध्ये घडलेल्या या दुर्घटनेत काही माणसांना आपला जीव गमवावा लागला तर काही जण जखमी झाले. या घडलेल्या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi about Mahakumbh Accident ) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली हळहळ व्यक्त केली आहे.

महाकुंभ येथे २९ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले. स्नानासाठी अनेक घाट बांधलेले असतानाही अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांनी संगमावरंच स्नान करण्याचा हट्ट केल्यामुळे हा प्रकार घडून आला. घडलेल्या दुर्घटनेनंतर संगमावर स्नान करण्यासाठी काही काळ बंदी घालण्यात आली. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

"प्रयागराज महाकुंभात घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असे पंतप्रधान मोदींनी ‌ट्विट करत सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121