युद्धविराम यशस्वी,पण.... इस्रालची मोठी घोषणा!

    19-Jan-2025
Total Views | 146

gz1

तेल अवीव : ऑक्टोबर २०२३ साली सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता अखेर पूर्णविराम मिळाला. अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या सहयोगाने युद्धविराम यशस्वी झाला. मागच्या दीड वर्षाच्या कालावधीत लाखो निष्पाप नागरिकांचा यामुळे बळी गेला. अशातच आता युद्ध थांबणार असल्याची चिन्हं दिसायला लागली आणि आखाती देशांनी सुटकेचा श्वास घेतला. इस्रायालचे पंतप्रपधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अशातच एक महत्वाची सूचना केली आहे. प्रसारमाध्यमांशी दूरस्थ प्रणालीतून संवाद साधताना नेतान्याहू म्हणाले की युद्धविरामाची बोलणी जर का अपयशी झाली तर इस्रायल युद्धाला परत एकदा सुरूवात करू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याच्यासहीत अनेक दहशतवाद्यांना संपवण्यात आम्हाला यश आला आहे. पश्चिम आशिई देशांचा आम्ही चेहरा आम्ही बदलला आहे. इस्रायल कुठल्याही प्रकारे कराराचे उल्लंघन सहन करणार नाही.इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी हमासने ओलिस ठेवलेल्या एकूण ३३ नागरिकांची यादी बनवली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये १,८९० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात ३३ ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका होणार आहे. कराराच्या अटींनुसार, इस्रायल गाझामधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरूवात करणार आहेत.

तीन टप्पयांमध्ये होणार युद्धविराम!
अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार युद्धविरामाचा पहिला टप्पा एकूण ६ आठवडे सुरू असेल, ज्यामध्ये संपूर्ण युद्धविरामाची अंमलबजावणी करण्यात येईल. हमास, ओलिस ठेवलेल्या ३३ इस्रायली नागरिकांना सोडणार आहे. त्याच बरोबर इस्रायलसुद्धा १,८९० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. या पहिल्या टप्प्यात, इस्रायली सैन्य गाझाच्या जास्त लोकसंख्या असलेल्या भागातून माघार घेईल. युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्पयात युद्ध पूर्णपणे थांबवण्यात येईल. ओलिस ठेवलेल्या उर्वरीत नागरिकांना सोडण्यात येईल. तिसऱ्या आणि शेवटच्या गाझाचे पुर्नवसन करण्यात येईल.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121