कावड यात्रेला विरोध करणाऱ्या जिहाद्यांची बरेलीत मिरवणूक

    16-Sep-2024
Total Views | 36
 
Kawad Yatra
 
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीत गेल्या काही दिवसांआधी उत्तर प्रदेशातील बरेलीत हिंदू समुदयाच्या कावड यात्रेवर (Kawad Yatra)  दगडफेक करण्यात आली होती. त्याचठिकाणी विरोध करणाऱ्या जिहाद्यांनी मिरवणूक काढून उन्माद केला आहे. ही घटना १५ सप्टेंबर दिवशी रात्री घडली होती. यावेळी अनेक हिंदूंनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कट्टरपंथींनी ही एक नवीन परंपरा असल्याचे म्हणत उन्माद केला. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी लक्ष घालत तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
बरेलीतील जुलै २०२४ रोजी कावड यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी कट्टरपंथींनी दगडफेक करत कावड यात्राला गालबोट लावले होते. मात्र, १५ सप्टेंबर रोजी कावड यात्रा निघालेल्या मोर्य गल्ली येथून कट्टरपंथींनी मोठी साऊंड सिस्टीम लावत मिरवणूक काढली होती. त्यावेळी काही लोकांनी याआधी असे कधी घडले नाही. मात्र आता मिरवणूक कशी काढली जात आहे? असा प्रश्न केला. तेव्हा कट्टरपंथींनी ही आमची नवीन परंपरा असल्याचे सांगत हिंदूंसोबत वाद घातला.
 
या घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक हिंदूंनी याला विरोध केला होता. मात्र कट्टरपंथी ऐकायचे नाव घेत नव्हते. त्यांनी कावड यात्रे ठिकाणाहूनच आम्ही आमची मिरवणूक घेऊन जाऊ असे सांगितले होते. त्यावेळी घटनास्थळी नजीकच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेले प्रकरण हताळण्याचे काम केले. कट्टरपंथींनी आपली मिरवणूक दुसऱ्या रस्त्याने घेऊन जाण्य़ास सांगितली.
 
यावेळी कट्टरपंथींनी घोषणाबाजी केल्या ते तिथून हटत नव्हते. मात्र यावेळी पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी करत जमलेल्या जमावाला शांत करत त्यांनी आपला मार्ग बदलण्यास सांगितला होता. त्यानंतर पोलिसांमुळे कट्टरपंथींची मिरवणूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121