झारखंडमध्ये आदिवासींच्या जागेवर कट्टरपंथींचा ताबा, लँड जिहादची पुनरावृत्ती

    25-Aug-2024
Total Views | 28
 
Land Jihad
 
रांची : आदिवासी लोकांच्या जागेवर कट्टरपंथींनी ताबा मिळवला असल्याची घटना झारखंड येथील जामताड़ा जिल्ह्यात घडली. आदिवासी लोकं ज्या ठिकाणी देवाची पूजा करायचे त्याच जागेवर कट्टरपंथींनी कबर बसवल्या आहेत. याचा अर्थ कट्टरपंथींनी जामताडा येथील आदिवासींच्या जागेवर ताबा मिळवला असल्याचा दावा झारखंड येथील भाजप नेत्यांनी केला. यामुळे हे लँड जिहादचे प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. यामुळे झारखंड येथील आदिवासी आणि कट्टरपंथींमध्ये वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना धारेवर धरले. तसेच याप्रकरणात सरकारला जाब विचारलेला आहे.
 
हे प्रकरण जामताड़ा जिल्ह्यातील नारायणपूर येथील आहे. २४ ऑगस्ट रोजी याच भागातील शहारपूर पंचायतीमध्ये राहणाऱ्या पिथुआडीह गावातील रहमतुल्ला यांचा मृत्यू झाला होता. रहतुल्ला यांची अंत्ययात्रा काढून कट्टरपंथी युवक रहतुल्लाला संबंधित जागेवर दफन करण्यात आले होते. ही माहिती आदिवासींना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कट्टरपंथींची बाजू उचलून धरली होती. यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यानंतर अंतिम क्षणी पोलिसांनी रहतुल्लाचा मृतदेह संबंधित जागेवर पुरण्यात आला.
 
याप्रकरणात आदिवासींनी नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी हे प्रकरण एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. स्थानिक प्रशासन हे कट्टरपंथींना पाठीशी घालत असल्याचे आदिवाशी लोकांचे म्हणणे होते. तणावाची परिस्थिती पाहता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. झारखंडचे भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी या कारवाईला 'लँड जिहाद' असे म्हटले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121