नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज, १७ जून रोजी नागरी विमान वाहतूक सुरक्षेबाबत एक उच्चस्तरीय बैठक होणे अपेक्षित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नागरी विमान वाहतूक सचिव, गुजरात सरकारचे प्रतिनिधी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो आणि इतर प्रमुख एजन्सींसह वरिष्ठ अधिकारी घटनेचा आढावा घेण्यासाठी आणि विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा प्रोटोकॉलचे मूल्यांकन करण्यासाठी या बैठकीत उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी बोईंगचे एक पथक आणि एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) चे अधिकारी एअर इंडिया विमान अपघाताच्या जागेची पाहणी करण्यासाठी अहमदाबादला पोहोचले.