राहुल गांधी नागरिकत्व याचिका मानली जाणार ‘जनहित याचिका’

    20-Aug-2024
Total Views | 134
rahul gandhi citizenship amendment plea


नवी दिल्ली :       लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयीच्या याचिकेवर ‘जनहित याचिका’ म्हणून सुनावणी होईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयास निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका ही ‘जनहित याचिका’ मानली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 

न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी हे प्रकरण जनहित याचिकांशी निगडीत रोस्टर खंडपीठाकडे पाठवले आहे. त्याचवेळी याचिकेच्या गुणवत्तेविषयी न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणात सार्वजनिक हित गुंतलेले आहे आणि म्हणूनच, हे प्रकरण जनहित याचिकांशी संबंधित रोस्टर खंडपीठासमोर जनहित याचिका म्हणून सूचीबद्ध केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121