राजेश खन्नांना दिलेली ‘बिग बॉस’ची ऑफर, निर्माते एका एपिसोडसाठी देणार होते कोटींच्या घरात पैसे, पण…

    15-Aug-2024
Total Views | 30

rajesh khanna  
 
 
 
मुंबई : मराठी असो किंवा हिंदी बिग बॉस या शोचे देशभरातच नाही तर जगभरात चाहते आहेत. सध्या मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सुरु असून यंदाच्या शोचा होस्ट रितेश देशमुख आहे. तर यापुर्वी नुकताच हिंदी बिग बॉसच्या ओटीटीचा तिसरा सीझन झाला ज्याचं होस्टिंग अनिल कपूर यांनी केलं होतं. तर टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या हिंदी बिग बॉसचं होस्टिंग सलमान खान गेले अनेक वर्ष करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यापुर्वी बिग बॉसची ऑफर दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना देण्यात आली होती.
 
राजेश खन्ना यांच्याबद्दल डिंपल कपाडिया बऱ्याचदा मुलाखतींमध्ये बोलल्या आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से त्यांच्याशी संबंधित लोकं बऱ्याचदा सांगत असतात. २०१२ मधील रेडिफच्या एका लेखानुसार, सिनेपत्रकार अली पीटर जॉन यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या. त्यात बिग बॉसच्या ऑफरचाही उल्लेखही करण्यात आला. करिअरला उतरती कळा लागल्यावरही राजेश खन्ना यांनी या शोची खिल्ली उडवली होती, असं त्यात म्हटलं होतं.
 
“एकदा बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला राजेश खन्ना यांच्याबरोबर मीटिंग फिक्स करण्यासाठी फोन केला होता. पण राजेश खन्ना म्हणाले होते, ‘नाही. राजेश खन्ना असे शो करणार नाही.’ मी त्यांची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शो करायला तयार झाले नाहीत. कलर्स टीव्हीने मला सांगितलं की ते खन्ना यांना एका एपिसोडसाठी साडेतीन कोटी रुपये देतील, पण तरीही त्यांनी नकार दिला होता. नंतर काही दिवसांनी राजेश खन्ना यांनी मला फोन केला आणि शो करायचा असल्याचं सांगितलं. पण तेव्हा कलर्सला (निर्मात्यांना) त्यांना शोमध्ये घेण्यात काहीच रस नव्हता,” असं अली पीटर जॉन यांनी म्हटलं होतं.
 
पुढे ते असं देखील म्हणाले होते की, २०१० पासून बिग बॉस हा शो सलमान खान होस्ट करत आहे, पण या शोचा तिसरा सीझन राजेश खन्ना यांचे प्रतिस्पर्धी महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला होता. अमिताभ बच्चन यांच्यामुळे खन्ना खूप असुरक्षित होते. त्यांनी अमिताभ यांचं लग्न होण्याआधी जया यांच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवल्या होत्या, तसेच त्या सेटवर आल्या की ते दुर्लक्ष करायचे.
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121