राज ठाकरेंनी स्पष्ट केली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका म्हणाले, "आरक्षण हे फक्त..."

    10-Aug-2024
Total Views | 77
 
Raj Thackeray
 
छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर राज ठाकरेंविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, आता त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या सगळ्यातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
राज ठाकरे म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून मराठावाड्यातील वातावरण आणि राजकारण पाहात आणि ऐकत होतो. आता त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो ते सर्वांनी ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. २००६ पासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषांवर द्यावं."
 
हे वाचलंत का? -  ठाकरे-पवारांचं राजकारण हे मराठा आरक्षणाआड सुरू : राज ठाकरे
 
"महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, हीसुद्धा माझी भूमिका आहे. महाराष्ट्रात शिक्षणापासून तर उद्योगधंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या मुलांना त्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलामुलींना त्या मिळत नाहीत. महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं आणि त्यातून माथी भडकवली जातात," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121