छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद!

    13-May-2024
Total Views | 116

EVM Machine 
 
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. सोमवारी सकाळी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते.
 
सकाळी ७ वाजतापासून चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले. मात्र, मतदानप्रक्रिया सुरु होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. याठिकाणी तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यानंतर लगेच २५ नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या. त्यामुळे आता सुरळीत मतदान सुरु आहे.
 
हे वाचलंत का? -  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! प्रवाशांची गैरसोय
 
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, याठिकाणी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121