कवच प्रणालीसाठी धोरणात्मक भागीदारी

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक पाऊल

    11-May-2024
Total Views | 19

railway


मुंबई, दि.१० :  
रेलटेलने क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसोबत ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (कवच) प्रणालीच्या अंमलबजावणी प्रकल्पांसाठी परदेशात भारतीय रेल्वेसाठी विशिष्ट संधींचा शोध आणि वितरीत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मिनी रत्न सीपीएसइ, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गतने भारतीय रेल्वे आणि परदेशात रेल्वेसाठी कवच (ट्रेन कोलिशन अवॉयडन्स सिस्टीम) अंमलबजावणी प्रकल्पांचा शोध आणि वितरण करण्यासाठी क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसह सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करार कवच संबंधित नवा आराखडा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
सामंजस्य कराराचे उद्दिष्ट

या सामंजस्य करारावर १ मे २०२४रोजी रेलटेल कॉर्पोरेट कार्यालय, नवी दिल्ली येथे स्वाक्षरी करण्यात आली. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कवच प्रकल्पासाठी आरडीएसओद्वारे मूळ उपकरण निर्माता म्हणून अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रेलटेलकडे रेल्वे सिग्नलिंग सिस्टीममधील तज्ञांची एक इन-हाउस टीम आहे आणि कवच सारखे मोठे अपग्रेड प्रकल्प हाती घेण्यास ती पूर्णपणे सक्षम आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या वैयक्तिक कौशल्यासह एकत्रितपणे आणि आक्रमकपणे कवच प्रकल्पाच्या संधी शोधतील.

कवच म्हणजे काय

कवच ही भारतीय रेल्वेने स्वदेशी विकसित केलेली स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ही एक उच्च तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे, ज्यासाठी सर्वोच्च ऑर्डरचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. जुलै २०२०मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही राष्ट्रीय ATP प्रणाली म्हणून स्वीकारली. भारतीय रेल्वे नेटवर्कवर कवचची अंमलबजावणी हे भारतीय रेल्वेच्या प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121