मुंबईत एप्रिलमध्ये ११ हजार घरांची विक्री

राज्याच्या तिजोरीत मुद्रांक शुल्कापोटी १०११ कोटी

    01-May-2024
Total Views | 30

housing



मुंबई, दि.१ :
एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्चमध्ये संपुष्टात आलेले आर्थिक वर्ष आणि १ एप्रिलपासून लागू झालेले रेडीरेकनरचे नवीन दर यामुळे दरवर्षी मार्चमध्ये घर विक्रीत वाढ होते. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती.


मार्च २०२१ मध्ये १७ हजार ७२८ घरे विकली गेली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. २०२२, २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र असे असले तरी २०२४ मधील ही आतापर्यंतची सर्वाधिक घर विक्री आहे. जानेवारीत १० हजार ९९७, तर फेब्रुवारीत १२ हजार ५५ घरे विकली गेली होती. मार्चमध्ये मात्र यात वाढ होऊन घरविक्रीच्या संख्येने १४ हजारांचा पल्ला पार केला. पण आता एप्रिलमध्ये यात काहीशी घट झाली असून एप्रिलमध्ये ११ हजार ६० घरांची विक्री झाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121