नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दि. १० मार्च रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली. हे सर्व उमेदवार पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या वेगवेगळ्या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा बशीरहाट (संदेशखाली) लोकसभा मतदारसंघाची आहे. येथून टीएमसीने विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांना हटवून माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना तिकीट दिले आहे. त्यात तृणमूलचा नेता शाहजहान शेख आणि त्यांच्या गुंडांना संदेशखाली अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हाजी नुरुल इस्लाम यांचा जन्म १९६४ मध्ये झाला. २००९ ते २०१४ या काळात ते TMC च्या तिकिटावर पश्चिम बंगालमधील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. बशीरहाटमधील टीएमसीचे उमेदवार हाजी नुरुल इस्लाम हे २०१० च्या देगंगा दंगलीतील मुख्य आरोपी आहेत. दुर्गापूजेत अडथळे निर्माण करण्यासाठी या दंगली घडवून आणल्याचा आरोप आहे. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देगंगा येथे २००९ च्या निवडणुकीत हाजी नुरुल इस्लाम यांनी टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला होता.
त्यानंतर त्यांनी सीपीआय नेते अजय चक्रवर्ती यांचा पराभव केला. तेव्हापासून एकेकाळी हिंदूबहुल असलेली देगंगा धार्मिक फाळणीची बळी ठरत असल्याचे मानले जाते. आता येथील लोकसंख्या खूप बदलली आहे. सध्या येथील स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात येत आहे.हाजी नुरुल इस्लाम यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या समर्थकांना कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जाण्याची घोषणा केली होती.
दि.६ सप्टेंबर २०१० रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे हिंदू समाज शिव मंदिराशेजारी दुर्गापूजेचे आयोजन करत होता. त्याच दिवशी मुस्लिमांनी स्मशानभूमीभोवती सीमा बांधण्यास सुरुवात केली. ही सीमा मंदिराच्या जमिनीपर्यंत पोहोचल्यावर हिंदूंनी विरोध सुरू केला. याच काळात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हाजी नुरुल इस्लाम यांनी मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात भडकवल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाजी नुरुल यांनी ५०० मुस्लिमांच्या जमावासह रास्ता रोको करून पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला होता.
हिंसक जमावाने पोलिस स्टेशनमधून परतत असताना वाटेत हिंदूंच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहने जाळण्यात आली. याशिवाय मंदिराचीही विटंबना करण्यात आली. ३ दिवस चाललेल्या या हिंसाचारात २५० हून अधिक दुकाने लुटण्यात आली आणि ५० हून अधिक घरे जाळण्यात आली. ५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देऊळगंगा बाजारातील मशिदींवरही माईक लावण्यात आले होते.