मंदिरात तोडफोड, हिंदूविरोधी दंगलीचा आरोप; तोच संदेशखालीतून ममतादिदींचा नवा उमेदवार!

    12-Mar-2024
Total Views |
Haji Nurul Islam


नवी दिल्ली :
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दि. १० मार्च रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली. हे सर्व उमेदवार पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या वेगवेगळ्या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा बशीरहाट (संदेशखाली) लोकसभा मतदारसंघाची आहे. येथून टीएमसीने विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांना हटवून माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना तिकीट दिले आहे. त्यात तृणमूलचा नेता शाहजहान शेख आणि त्यांच्या गुंडांना संदेशखाली अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हाजी नुरुल इस्लाम यांचा जन्म १९६४ मध्ये झाला. २००९ ते २०१४ या काळात ते TMC च्या तिकिटावर पश्चिम बंगालमधील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. बशीरहाटमधील टीएमसीचे उमेदवार हाजी नुरुल इस्लाम हे २०१० च्या देगंगा दंगलीतील मुख्य आरोपी आहेत. दुर्गापूजेत अडथळे निर्माण करण्यासाठी या दंगली घडवून आणल्याचा आरोप आहे. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देगंगा येथे २००९ च्या निवडणुकीत हाजी नुरुल इस्लाम यांनी टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी सीपीआय नेते अजय चक्रवर्ती यांचा पराभव केला. तेव्हापासून एकेकाळी हिंदूबहुल असलेली देगंगा धार्मिक फाळणीची बळी ठरत असल्याचे मानले जाते. आता येथील लोकसंख्या खूप बदलली आहे. सध्या येथील स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात येत आहे.हाजी नुरुल इस्लाम यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या समर्थकांना कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जाण्याची घोषणा केली होती.

दि.६ सप्टेंबर २०१० रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे हिंदू समाज शिव मंदिराशेजारी दुर्गापूजेचे आयोजन करत होता. त्याच दिवशी मुस्लिमांनी स्मशानभूमीभोवती सीमा बांधण्यास सुरुवात केली. ही सीमा मंदिराच्या जमिनीपर्यंत पोहोचल्यावर हिंदूंनी विरोध सुरू केला. याच काळात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हाजी नुरुल इस्लाम यांनी मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात भडकवल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाजी नुरुल यांनी ५०० मुस्लिमांच्या जमावासह रास्ता रोको करून पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला होता.

हिंसक जमावाने पोलिस स्टेशनमधून परतत असताना वाटेत हिंदूंच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहने जाळण्यात आली. याशिवाय मंदिराचीही विटंबना करण्यात आली. ३ दिवस चाललेल्या या हिंसाचारात २५० हून अधिक दुकाने लुटण्यात आली आणि ५० हून अधिक घरे जाळण्यात आली. ५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देऊळगंगा बाजारातील मशिदींवरही माईक लावण्यात आले होते.



अग्रलेख
जरुर वाचा
पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121