स्त्रीरोग आणि हॉमियोपॅथीचे योगदान (भाग-०३)

    26-Feb-2024
Total Views | 24
Contribution of Gynecology and Homeopathy


आजच्या काळात औषधांचे होणारे सततचे दुष्परिणाम ही एक मोठी गंभीर बाब ठरली आहे. उदाहरणच घ्यायचे झाले, तर वेदनाशामक गोळ्या, ज्यांना इंग्रजीमध्ये ‘नॉन स्टीरॉईडल अँटी इनफ्लमेटरी ड्रग्ज’ असे म्हणतात, अशा औषधांनी रुग्णाचे यकृत व मूत्रपिंड यांसारखे महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. उपचारापेक्षा अपायच अधिक होऊ शकेल, अशा प्रकारची ही औषधे अत्यंत उपयोगी आणि उपकारक ठरतात व त्यांचे कुठलेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. याशिवाय त्यांची गुणवत्ता, उपयुक्तता व गतिमानता ही ‘आयआयटी मुंबई’च्या शास्त्रज्ञांनी प्रयोगसहीत सिद्ध केली आहे.होमियोपॅथी ही स्त्रीरोगामध्ये स्त्रीच्या प्रत्येक वयोगटात स्त्रीला साथ देत असते. अगदी बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत सर्व स्थित्यंतरासाठी व त्यातील त्रासांवर मात करण्यासाठी होमियोपॅथीक औषधे सक्षम आहेत. आपल्या अभ्याससाठी आपण स्त्रीच्या आयुष्याचे चार भाग करूया.


1) वयात येणारी मुलगी
2) लग्न झालेली व नंतर गरोदर असलेली स्त्री
3) मध्यमवयीन स्त्री
4) रजोनिवृत्तीच्या जवळ आलेली व रजोनिवृत्ती झालेली वयस्कर स्त्री

वयात येणारी मुलगी

साधारणपणे वयाच्या 10 ते 14 या वर्षांमध्ये मुलीच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल होत असतात. मुलीच्या शरीरात असणारी स्त्री संप्रेरके ही उद्दिपीत होऊन त्या सक्रिय होतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ’केीोपरश्र लहरपसशी’ असे म्हणतो. या संप्रेरकांच्या सक्रियेतमुळे मग लैंगिक बदल व गुप्तांगांची वाढ होऊ लागते. स्तनवृद्धी होते, मुलीला मासिक स्राव किंवा मासिक पाळी चालू होते. या मासिक पाळीच्या वेळेस मुलींना त्रास होऊ शकतो. याच स्थितीला मासिक पाळीच्या वेळची अस्वस्थता किंवा ’Hormonal changes’ असे म्हणतात. यात मुलीच्या मासिक पाळी येण्याच्या अगोदर व दरम्यान होणार्‍या शारीरिक व मानसिक बदल व त्रासांचा अभ्यास केला जातो. नेहमी दिसणार्‍या त्रासांपैकी हा त्रास आहे. त्याची लक्षणे ही खालीलप्रमाणे आहेत.

- स्त्रीच्या मनात भावनिक बदल होऊ लागतात. राग येणे, चिडचिड होणे, भीती वाटणे, अस्वस्थ वाटणे.
- पोट फुगंणे, तसेच जड वाटणे
पोटात दुखणे.
- स्तन दुखणे, घट्ट होणे, छाती भरून येणे
- चेहर्‍यावर मुरुम व पुटकुल्या येणे
- बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे
- डोके दुखणे
- खाण्यापिण्याच्या सवयीत काही विशिष्ट गोष्टी खाण्याश्या वाटणे उदा. गोड

स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र साधारणपणे 28 दिवसांचे असते. साधारणपणे 14व्या दिवशी अंडाशयामधून अंड बाहेर पडते, याच प्रक्रियेला ‘अंडमोचन’ म्हणजेच ‘ओव्ह्यूलेशन’ असे म्हटले जाते. यानंतर साधारणपणे 28व्या दिवशी स्राव सुरू होतो. मासिक पाळीची अस्वस्थता ही साधारणपणे पाळीच्या 14व्या दिवसांपासून सुरू होऊन पाळीनंतर सात दिवसांपर्यंत राहू शकते. परंतु, यात प्रत्येक स्त्रिच्या शारीरिक व मानसिक रचनेनुसार बदल होत असतात. (क्रमश:)


- डॉ.मंदार पाटकर



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121