लखनऊ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक मुस्लिम जोडप्याने घरवापसी केली आहे. आता अब्दुल्ला शिवप्रसाद बनले आहेत, तर त्यांची पत्नी फातिमा आता कविता या नावाने ओळखली जाणार आहे. दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी विधीनुसार सुंदरकांड पठण आणि हवन करून कुटुंब घरीने हिंदू धर्मात घरवापसी केली. २५ वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या या जोडप्याने सनातनी लोक म्हणून आपले जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिवप्रसाद मूळचा वाराणसीचा आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी तो उदरनिर्वाहासाठी फतेहपूरच्या हथगाम पोलीस स्टेशन परिसरात आला होता. येथे तो अधारी गावात एका मुस्लिम व्यक्तीच्या घरात भाड्याने राहू लागला. घरमालकाने अनेकदा त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले. एके दिवशी त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली शिवप्रसाद यांनी आणि पत्नीने इस्लामचा स्वीकार केला. आणि शिवप्रसाद यांनी त्यांचे नाव अब्दुल्ला आणि पत्नी कविताचे नाव बदलून फातिमा ठेवले.
सुमारे ६ महिन्यांपूर्वी शिवप्रसाद यांनी आधारी गावात घर बांधून घेतले. ते म्हणतात की,ते सनातनी होते आणि भविष्यातही तसेच राहतील. इस्लामचा स्वीकार करण्यामागे त्यांनी आजूबाजूचे लोक आणि वातावरण कारणीभूत असल्याचे सांगितले. सुमारे २० दिवसांपूर्वी शिवप्रसाद यांनी राम दल या स्थानिक हिंदू संघटनेचे अध्यक्ष एजेंद्र साहू यांच्याशी संपर्क साधून पुन्हा सनातनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. एजेंद्र साहू यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी धर्मांतरित जोडप्याला सुरक्षिततेची हमी दिली. अखेर मंगळवारी पती-पत्नी यांनी हिंदू धर्मात घरवापसी केली.
यावेळी शिवप्रसाद यांच्या घरी सुंदरकांड पठण करण्यात आले, ज्यामध्ये स्थानिक हिंदू संघटनेचे सदस्यही सहभागी झाले होते. नंतर एक हवन झाला ज्यात पती-पत्नी सनातनी पोशाखात सहभागी झाले होते. दोघांनीही पुन्हा सनातनी झाल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. भविष्यातही सनातनी राहण्याचा संकल्प त्यांनी केला.