विशेष टीप्स: वाढत्या पगाराबरोबर वाढते आर्थिक नियोजन का महत्वाचे ?

नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते

    20-Feb-2024
Total Views | 38

Financial Planning
 
 
विशेष टीप्स: वाढत्या पगाराबरोबर वाढते आर्थिक नियोजन का महत्वाचे ?
 

नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते
 
 
मोहित सोमण
 
 
आयुष्यात नियोजन हा खूप महत्वाचा शब्द आहे. या नियोजनामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचे संतुलन ठेवण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या पगाराबरोबर वाढत्या महागाईला सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन हा प्रमुख पर्याय ठरतो. सरासरी दरवर्षी १० ते १५ टक्क्याने प्रत्येक व्यक्तीच्या पगारात व मानधनात वाढ होत असते‌. त्यांचे नियोजन हे भविष्यातील संभाव्य खर्च, नियमित खर्च, अनपेक्षित खर्च, जीवनावश्यक खर्च अशा विविध कसोट्यांवर करणे अपेक्षित असते.
 
त्यासाठी आवश्यक महत्वाच्या टिप्स -
 

वाढीव पगाराचे नियोजन - आर्थिक ताळेबंदीपलीकडे विचार केल्यास आर्थिक नियोजन यशस्वी होते. जर पगार अथवा उत्पन्न वाढल्यास ते ज्या पटीने वाढते त्या आर्थिक आधाराचा पाया समजून घेणे महत्वाचे ठरते. पुढील दैनंदिन जीवनशैलीचा विचार करण्यापूर्वी थकित देये, दैनंदिन ठराविक खर्च, भविष्यातील आजारपणासाठी केलेली तरतूद यानंतर संभाव्य जीवनशैलीचा केल्यास तो फलदायी ठरेल.
 

यातील किती रकमेची गुंतवणूक अपेक्षित - गुंतवणूकीची रक्कम ही विविध पातळ्यांवर अवलंब असते‌. ती आपल्या उत्पन्न, गरज, खर्च, भविष्यातील गुंतवणूकीची ध्येय या विविध पातळ्यांवर अवलंबून असते. आर्थिक नियोजनात काटेकोरपणे विचार करताना आपल्याला मिळणारे उत्पन्न व भविष्यातील नक्की गुंतवणूकीचे ध्येय काय याची सांगड घातल्यास याचे उत्तर निश्चितपणे मिळू शकते.
 

कुटुंबाचे आर्थिक नियोजन - बदलत्या परिस्थितीत काळानुरूप खर्च बदलतात. काळानुसार विविध गरजाही वाढू शकतात. याखेरीज बदलत्या काळातील अर्थाचे गणित बदलले जाते. महागाई, वैयक्तिक खर्च, गुंतवणूकीचे पर्याय, संभाव्य बाजारातील आर्थिक दशा यांचा सांगोपांग विचार करणे अपेक्षित आहे.
 
संतुलित गुंतवणूक - आर्थिक उत्पादनात गुंतवणूक करताना त्या गुंतवणूकीचे फायदे, क्षमता , काल निश्चिती, व्याजदर, भविष्यातील अनुमान या पर्यायाचा विचार करून विविध गुंतवणूकीत पैसे गुंतवल्यास एक सुरक्षित भविष्य आपल्याला मिळू शकते. एकाच ठिकाणी गुंतवणूक ही कायम मर्यादित व असुरक्षित असते.
 
एसआयपीसाठी सल्ला - सिस्टिमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅन हा नोकरदार वर्गासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. यात इक्विटी इंट्राडेपेक्षा नफ्याचे प्रमाण कमी असले तरी ही गुंतवणूक जास्त सुरक्षित ठरते. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत अर्थतज्ज्ञांच्या सल्याने गुंतवणूक केल्यास निश्चित कालात ठराविक फायदा हा गुंतवणूकीवर मिळत राहतो. अर्थात याचा विचार करताना दरमहा किती रूपयांची एस आय पी मध्ये गुंतवणूक करू शकतो हे आपल्या उत्पन्न व खर्च यांचे ठोकताळे बांधून गुंतवणूक करणे अपेक्षित असते.
 

निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन - सेवा काळातच याचे नियोजन केल्यास भविष्यातील तरतूदीसाठी याचा लाभ होतो. सेवेत असताना प्रोव्हिडंट फंड, रिटायर्डमेंट फंड यांचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील ताण कमी होतो. रिटायरमेंनंतरचा गरजा लक्ष घेता उरलेला अतिरिक्त पैसा विविध योजनेत गुंतवल्यास अधिक प्रमाणात परतावा मिळू शकतो.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121