अधिवेशनाआधी विरोधकांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली 'ही' मागणी

    20-Feb-2024
Total Views | 42

Eknath Shinde


मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. दरम्यान, याआधी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे आरक्षणासंबंधी वेगवेगळ्या मुद्दांवर स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
मराठा आरक्षणाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या विशेष अधिवेशना बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे खालील मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
 
यामध्ये मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार? ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार? आणि सगे सोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्यावी, इत्यादी मुद्दे या पत्रात मांडण्यात आले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121