‘मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ आणि ओळख मिळावी हाच महाराष्ट्र शासनाचा उद्देश’

    22-Nov-2024
Total Views | 40
Marathi Films

पणजी : ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बाजार’ या उपक्रमात ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागा’तर्फे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून चार मराठी चित्रपटांचे ( Marathi Films ) प्रदर्शन दि. २१ नोव्हेंबर ते दि. २३ नोव्हेंबर या दरम्यान गोवा, पणजी येथे केले जाणार आहे. या उपक्रमाबद्दल दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.

मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी राज्य शासन राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल काय सांगाल?

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने फिल्मसिटी डिपार्टमेन्ट गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. जेणेकरून मराठी नवोदित कलावंतांना जागतिक व्यासपीठ ‘इफ्फी’च्या निमित्ताने मिळते. मराठी चित्रपटांची प्रसिद्धी या माध्यमातून व्हावी हा फिल्मसिटीचा मूळ उद्देश असून त्यासोबतच महाराष्ट्रातील चित्रिकरणाची ठिकाणे आणि पर्यटनही आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय दिग्दर्शक, कलाकार आणि इतर तंत्रज्ञांच्या सेवेसाठी राज्य शासनाने सुरू केलेला ‘सिंगल विंडो’ हा उपक्रमही आम्ही ‘इफ्फी’च्या माध्यमातून इतर राज्ये आणि परदेशांतील कलाकारांपर्यंत पोहोचवत आहोत, ज्यामुळे मराठी चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांनाही अधिक प्रसिद्धी मिळण्यास मदत होईल.

मराठी चित्रपटांसाठी ‘इफ्फी’ हे व्यासपीठ किती महत्त्वाचे आहे?

‘इफ्फी’ला आम्ही २०१५ सालापासून मराठी चित्रपट प्रसिद्धीसाठी घेऊन येत आहोत. ज्यात दरवर्षी पाच ते दहा चित्रपटांचा समावेश असतो. सामाजिक, सांस्कृतिक भान ठेवून लोकांना संदेश देणार्‍या कथानकांचा विशेष विचार आम्ही करतो. कारण, स्वतंत्ररित्या चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित करणार्‍यांना आपला चित्रपट मोठ्या स्तरावर कसा पोहोचवावा किंवा त्याचे बाजारीकरण नेमके कुठे आणि कसे करावे, याची माहिती नसल्यामुळे ‘इफ्फी’सारखे चित्रपट महोत्सव स्वतंत्र मेकर्सना नवी भरारी देणारे नक्कीच असतात. शिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना परदेशातील चित्रपट वितरकदेखील उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याशी जोडले गेल्याने त्यांना मार्केटिंग स्ट्रॅटजी आखण्यासाठी मदत मिळते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजकही आले असल्यामुळे इतर अनेक देशांमध्येही मराठी चित्रपट, त्यातील विषय आणि कलाकारही परदेशातील चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

५५व्या चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची कोणत्या निकषांवरून निवड करण्यात आली?

चित्रपट क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणार्‍या दिग्गज कलाकारांची एक समिती शासनाच्यावतीने नेमण्यात आली आहे. आणि ही मंडळी चित्रपटांचा आशय, विषय, कथा, कलाकारांची निवड, संगीत, दिग्दर्शन, कथेची मांडणी या सगळ्या आयामांचा विचार करूनच चित्रपटांची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडले जातात. तज्ञांच्या शिफारसीनुसार यंदा २७ चित्रपटांमधून ‘तेरवं’, ‘विषय हार्ड’, ‘आत्मपॅम्फलेट’ आणि ‘छबिला’ या चित्रपटांची निवड केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121