महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार

मतदानोत्तर कलांचा अंदाज; भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष

    21-Nov-2024
Total Views | 56

Mahayuti
 
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने सलग तिसऱ्यांदा महायुतीला पसंती दर्शवली असून, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार विराजमान होण्याचा अंदाज मतदानोत्तर कलांमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.
'मॅट्रिझ'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महायुतीला १५० ते १७० तर महाविकास आघाडीला ११० ते १३० जागा मिळतील. 'चाणक्य'च्या कलांनुसार, महायुतीला १५२ ते १६० आणि मविआला १३० ते १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 'पोल डायरी' या संस्थेच्या मतदानोत्तर कलांप्रमाणे महायुतीला १२२ ते १८६, तर मविआला ६९ ते १२१ जागा मिळतील. 'इलेक्टोरल एज' यांच्या पोलने मात्र महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, महायुतीला १२१ आणि महाविकास आघाडीला १५० जागा मिळतील.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर जाहीर झालेल्या सर्व मतदानोत्तर कलांमध्ये भाजप हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'चाणक्य'च्या कलांनुसार भाजप ९०, शिवसेना ४८ आणि राष्ट्रवादी २२ जागा मिळवून सत्ता स्थापन करतील. तर काँग्रेस ६३, शरद पवार गट ४० आणि उबाठा गटाची गाडी ४८ जागांवर थांबेल. 'पोल डायरी' या संस्थेच्या मतदानोत्तर कलांप्रमाणे भाजप ७७ ते १०८, शिवसेना २७ ते ५०, राष्ट्रवादीला १८ ते २८ जागा मिळतील. तर, काँग्रेस २८ ते ४७, शरद पवार २५ ते ३९ आणि उद्धव ठाकरेंना १६ ते ३५ जागा मिळू शकतील.
 
मविआत उद्धव ठाकरे लहान भाऊ
 
महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा आव आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मतदारांनी जबर धक्का दिल्याचे दिसून येत आहे. सर्व संस्थांच्या मतदानोत्तर कलांनुसार, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे लहान भाऊ ठरतील. शरद पवार आणि काँग्रेस त्यांच्यापेक्षा अधिकच्या जागा मिळवतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणाला किती जागा मिळणार? 
 
पोल संस्था महायुती महाविकास आघाडी इतर
 
चाणक्य १५२-१६० १३०-१३८ ६-८
मॅट्रिझ १५०-१७० ११०-१३० ८-१०
पोल्स ऑफ पोल्स १४० १३० १८
पी. मर्क १३७-१५७ १२६-१४६ २-८
रिपब्लिक १३७ - १५७ १२६ - १४६ -
लोकशाही रुद्र १२५-१४० १२८-१४२ १८-२३
पोल डायरी १२२-१७६ ६९-१२१ १२-९
लोकपोल ११५-१२८ १५१-१६२ ५-१४
इलेक्टोरल एज १२१ १५० १७


List
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121