महाराष्ट्र सदनाचे उद्या अयोध्येत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

    07-Oct-2024
Total Views | 56

ayodhya
 
डोंबिवली, दि. ६ : ( Maharashtra sadan ) महायुती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला होता. त्याचा पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी जून महिन्यात उत्तर प्रदेश सरकारला दहा टक्के रक्कम चुकती केली होती. उद्या दि. 8 ऑक्टोबर रोजी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते उत्तर प्रदेश ग्रीन फील्ड टाऊनशिप अयोध्या येथे महाराष्ट्र सदनाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
 
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील अनेक कारसेवकांनी श्रीराम मंदिरासाठी बलिदान दिले. राम मंदिर स्थापनेनंतर दररोज महाराष्ट्रातून अयोध्येत दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. यासाठी अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा मोठा निर्णय घेतला. अयोध्येत होणार्‍या या भूमिपूजन सोहळ्यास सार्वजानिक बांधकाम खात्याच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजानिक बांधकाम खात्याचे सदाशिव साळुंखे, संजय दशपुते, राजेंद्र राहणे अणि विवेक बडे आदी अधिकारी मंत्री चव्हाण यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121