ठाण्यात दिवाळी आधीच विकासाचे फटाके

वर्तुळाकार मेट्रो, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासह अन्य महत्वाच्या प्रकल्पांना मान्यता

    02-Oct-2024
Total Views | 52

thane metro
ठाणे, दि.०१ : (Thane) महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील तीन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुख्य मेट्रोला जोडण्यात येणाऱ्या वर्तुळाकार मेट्रोसाठी १२ हजार ५०० कोटी, ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटीचे कर्ज तसेच केमिकल रिसर्च केंद्राला भूखंड देण्यास मान्यता, अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ठाण्याचे रूपडे बदलणार असून दिवाळी आधीच ठाण्यात विकासाचे फटाके वाजू लागल्याची चर्चा रंगली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष रखडलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापूर्वी केंद्राने देखील या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
 
वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेकरांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी असे मुख्यमंत्र्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे.
 
दुसरीकडे ठाणे (टिकूजींनी वाडी) ते बोरिवली हे अंतर अवघ्या २० मिनिटात पूर्ण करणाऱ्या या मार्गाच्या कामासाठी १५ हजार कर्ज घेण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आग्रही आहेत. दरम्यान शिळफाटा येथे केमिकल रिसर्च सेंटर उभारण्यासाठी लागणारा भूखंड देण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121