शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही!

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

    04-Sep-2023
Total Views | 84

sharad pawar


मुंबई :
शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारले गेले. हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना आता जालना येथील घटनेवर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाविजय २०२४ अभियानांतर्गत अकोला लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे यांनी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवार गेली ४० वर्षे सत्तेत असून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कधी प्रयत्न केला नाही.

उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे तेच अनेकदा बोललेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला, तो सुप्रीम कोर्टात टिकविला. परंतु, शरद पवारांचे लाडके उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने सरकारची बाजू मांडली नाही. तेव्हा शरद पवार हेच सरकारचे कर्ते-धर्ते होते, असाही टोला त्यांनी लगावला.

दंगलीची भाषा करू नये
देशात दंगली घडतील या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर उत्तर देताना श्री बावनकुळे म्हणाले, हा देश भगवान तथागत गौतम बुद्धांचा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी दंगलीची भाषा करू नये अशी अपेक्षा आहे. मोदीजींच्या काळात या देशात दंगली घडविण्याची कुणाचीही हिम्मत नाही.

ते असेही म्हणाले
• सर्व पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, परंतु, कॉंग्रेसच्या यात्रेला समर्थन मिळणार नाही.
• बारा बलुतेदार, अठरा पडग जातींसह सर्वानांच मोदीजी पंतप्रधान हवेत. ५१% हून अधिक मते मिळणार.
• उद्धव ठाकरे यांच्या विमानाचे पायलट संजय राऊत; ते पडणार याची माहिती सर्व कार्यकर्त्यांना आहे
• देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाचे सामाजिक- आर्थिक विश्लेषण केले.
• एकनाथ शिंदे सारखा मर्द मराठा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस व अजित पवार मराठा आरक्षण देणार.

अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121