दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकाऊंट हॅक

    28-Jul-2023
Total Views | 59

prabhas



 बाहूबली चित्रपटापासून खरं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलेला तेलुगु अभिनेता प्रभास सध्या अडचणीत आला आहे. प्रभास तसा समाज माध्यमावर फारसा सक्रिय नसला तरीही त्याचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द प्रभासने ही माहिती दिली आहे. गुरुवारी २७ जुलैच्या रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले असून हॅकर्सनी त्याच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हिडिओ शेअर केले होते. या घटनेनंतर प्रभासने ट्वीटरवर माहिती देत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली.
 
 
 
प्रभास आदिपुरुषच्या अपयशानंतर आता अॅक्शन-थ्रिलर चित्रपट सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून ‘सालार’ ‘केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘प्रोजेक्ट के’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121