‘पंचायत’ सिझन ५ लवकरच येणार? कथानक, कलाकार आणि फुलेरा गावात पुढे काय होणार याची झलक!

    30-Jun-2025   
Total Views |

will panchayat season 5 be coming soon

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सुपरहिट वेब सिरीज 'पंचायत' च्या पाचव्या सिझनची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'फुलेरा' या काल्पनिक उत्तर भारतीय गावातील सरपंच, सचिव, आणि ग्रामस्थांच्या साध्यासुध्या पण प्रभावी जीवनावर आधारित ही मालिका आजवर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेली आहे. आता सिझन ५ बाबत काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत.

'पंचायत' सिझन ५ ची तयारी सुरु झाली असून लेखन आणि दिग्दर्शनाचं प्राथमिक काम जवळपास पूर्ण झालं आहे. मालिकेतील अभिनेत्री संवीका (रिंकी) हिने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. तिच्या मते, सिझन ५ चं शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, २०२६ च्या मध्यकाळात हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

फुलेरा गावात कोण परतणार?
यावेळीही मालिकेचे मूळ कलाकार त्यांच्या भूमिकांमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. त्यात जितेंद्र कुमार (अभिषेक त्रिपाठी), नीना गुप्ता (मंजूदेवी), रघुवीर यादव (सरपंच), फैसल मलिक (प्रह्लाद पांडे), चंदन रॉय (विकास), आणि संवीका (रिंकी) यांचा समावेश आहे. त्यांचे परस्पर संबंध, गावातील राजकीय उलथापालथी आणि स्थानिक समस्या हे कथानक पुढे नेतील.

सिझन ५ मध्ये काय पहायला मिळणार?
सिझन ४ च्या शेवटी अभिषेकला गावातून बदलीची नोटीस मिळते आणि रिंकीसोबत त्याचे भावनिक नाते अधिक स्पष्ट होते. त्यामुळे सिझन ५ मध्ये अभिषेक आणि रिंकीच्या नात्याचा पुढचा टप्पा, त्यांचं लग्न, अभिषेकचं करिअर आणि फुलेरा गावाच्या सामाजिक-राजकीय घडामोडी यावर लक्ष असण्याची शक्यता आहे. तसेच सरपंच आणि उपसरपंच पदांवरून होणाऱ्या निवडणुका, प्रह्लाद पांडेच्या आयुष्यातील भावनिक रिकामपणा, आणि विकाससारख्या पात्रांची वैयक्तिक प्रगती याही कथानकाच्या महत्त्वाच्या धाग्यांपैकी असतील.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.