उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा एनजीओ फेडरेशन तर्फे राज्यभरात वृक्षारोपण !

    22-Jul-2023
Total Views | 45
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis Birthday Occasion

मुंबई
: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यभरात वृक्षारोपण करण्यात आले असून राज्यभरातील संलग्न असलेल्या ५३ एनजओंच्या वतीने महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ५३ ठिकाणी ५३ वृक्ष लागवड संकल्प करण्यात आला आहे अशी माहिती महा एनजी फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी दिली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै २०२३ रोजी साजरा झाला या निमित्ताने भाजपकडून राज्यभर विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्रीआनंदऋषीं वन येथे वृक्षारोपण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिम्मित सेवा उपक्रम मागील ५ वर्षापेक्षा अधिक काळ महा एनजीओ फेडरेशन राबवित आहे व समाजातील नानाविध घटकांना याचा विशेष लाभ होतो. यावेळी संस्थापक शेखर मुंदडा, संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले , अपूर्वा करवा, विठ्ठल काळे उपस्थित होते.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121