आशियाई क्रीडास्पर्धेत पुनिया, फोगाट यांना थेट प्रवेश

अन्य कुस्तीपटूंचा न्यायालयात जाण्याचा इशारा

    19-Jul-2023
Total Views | 32
Bajrang Punia Direct Entry In Asian Games

नवी दिल्ली : आशियाई क्रिडास्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्याविरोधात कुस्तीपटू विशाल कालीरमण आणि अंतिम पंघाल यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

चीनमधील हांगझोऊ येथे सप्टेंबर महिन्यात आशियाई क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या तदर्थ समितीने मंगळवारी खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियम येथे २२ आणि २३ जुलै रोजी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विनेश फोगाट (५३ किलो वजनीगट) आणि बजरंग पुनिया (६५ किलो वजनीगट) सहभाग घेणार नाहीत. तदर्थ समितीने संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या इच्छेविरुद्ध या दोघांनाही चाचणीशिवायच संघात स्थान दिले आहे. या निर्णयाविरोधात या दोन्ही वजन गटातील इतर कुस्तीपटूंमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने विनेश फोगाटला चाचणीशिवाय स्पर्धेत प्रवेश दिल्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, गेल्या एक वर्षापासून सराव नसतानाही विनेशला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. आपण २०२२ सालच्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकूल क्रिडास्पर्धेच्या चाचण्यांमध्येही विनेशसोबतचा सामना ३ – ३ अशा बरोबरीत सोडविला होता. मात्र, त्यावेळीदेखील माझी फसवणूक करण्यात आली होती. विनेश फोगाटचा पराभव केवळ आपणच नव्हे, तर अन्य कुस्तीपटूही करू शकतात. विनेशने गेल्या वर्षभरात कोणतीही मोठी कामगिरी केली नाही. असे असतानाही त्याला कोणत्याही चाचणीशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवले जात आहे. हा अत्यंत निराश करणारा निर्णय असल्याचे पंघाल हिने म्हटले आहे.
 
कुस्तीपटू विशाल कालीरमण यांनेदेखील निषेध व्यक्त केला आहे. तो म्हणाला, बजरंग पुनियाला कोणत्याही चाचण्यांशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. वर्षभरापासून ते आंदोलन करत आहेत, तर आम्ही सराव करत आहोत. आम्ही १५ वर्षांपासून सराव करत आहोत. त्यामुळे आम्हाला न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही कालीरमण यांनी म्हटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121