‘पीएम मित्रा’ पार्कच्या माध्यमातून राज्यात रोजगारनिर्मिती करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

    16-Jul-2023
Total Views | 35

MahaMTB


मुंबई
: ‘पीएम मित्रा’ पार्क च्या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच, उद्योग विभागाच्या वतीने राज्यातील उद्योजकांसाठी जे जे लागेल ते देण्यासाठी सहकार्य करेल, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात फडणवीस शिंदे पवार सरकार आल्यापासून दहा महिन्यात १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, राज्याला उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी उद्योग विभाग कटिबध्द असून ‘पीएम मित्रा’ पार्कमुळे १२ महिन्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार असून १५ हजार कोटी उद्योजकांच्या खात्यावर जमा होणार आहेत, असेही उद्य सामंत यांनी सांगितले. तसेच, राज्यातील उद्योजकांना याठिकाणी जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रकल्पासाठी लागणारी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात एका महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात १८३ कोटी जमा करण्यात आले. तसेच, राज्यात चांगले कौशल्य विकास केंद्र तयार करण्यात येणार असून यामाध्यमातून चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार असल्याचेही उद्योगमंत्री सामंतांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121