मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. चांद्रयान-३ आपल्या पूर्वनिर्धारित वेळेनुसार २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रावर जाण्याचा प्रवासाला निघाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ ची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. पण तुम्हाला माहित आहे का? कोणत्याही यानाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथूनच का होते. यामागे कारण आहे, श्रीहरिकोटाची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती. श्रीहरिकोटा हे विषववृत्तापासून जवळ आहे.
त्यामुळे ही जागा पूर्व दिशेला जाणाऱ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी योग्य मानली जाते. सोबतच श्रीहरिकोटाच्या आसपास दाट लोकवस्ती नाही. यामुळे यान फेल झाल्यास जीवितहानी टाळता येते. सोबतच श्रीहरिकोटा पुर्व किनारपट्टीवर असल्याने इथून जास्त व्हेलॉसिटी मिळते.