इराणच्या आण्विक तळांवरुन ४०० किलो युरेनियम गायब! गेलं कुठे? अमेरिका चिंतेत

    25-Jun-2025   
Total Views | 49

वॉशिंग्टन : (Iran) इराण-इस्त्रायल कडून अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर युद्धसमाप्तीची घोषणा झाली. परंतु आता यानंतर एक नवा प्रश्न अमेरिकेसह जगाला भेडसावत आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्दो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले करत समृद्ध युरेनियमचा साठा पूर्णतः नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच आण्विक तळांवरील ४०० किलो युरेनियम इराणने इतरत्र हलवल्याचा दावा केला जात आहे.

युरेनियम गायब झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी दिला दुजोरा 

अमेरिकेने केलेल्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरमध्ये इराणचा अणुबॉम्ब प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. त्याचवेळी पेटेंगॉन येथील अमेरिकेच्या डिफेन्स इंटलिजन्स एजन्सी म्हणजेच डीआयएने सादर केलेल्या गुप्त अहवालात इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त झाले नसून त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे, हे तळ काही महिन्यांत पुन्हा कार्यरत होतील, असे सांगण्यात आले आहे. पण एकीकडे हा संभ्रम चालू असतानाच या तळांवरून इराणनं हल्ल्याआधीच अणूबॉम्ब बनवण्यासाठी महत्वाचं असलेलं तब्बल ४०० किलो युरेनियम सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती समोर आली. या वृत्ताला दुजोरा देत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी एका मुलाखतीत इराणमधून ४०० किलोग्रॅम युरेनियम गायब असल्याची माहिती दिली.

४०० किलो युरेनियम गेले कुठे?

या हल्ल्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक B-2 स्टेल्थ बॉम्बर्सने ३०,००० पाऊंड वजनाच्या बंकर -बस्टर बॉम्बचा वापर केला होता. परंतु इतक्या विध्वंसक हल्ल्यानंतरही अमेरिकेकडूनच संशय व्यक्त केला जात आहे की, इराणचा युरेनियम साठा सुरक्षित आहे. जर हा दावा खरा असेल तर प्रश्न उरतो की, इराणनं ४०० किलो युरेनियम नेमके कुठे दडवून ठेवले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या आधी फोर्दो आण्विक तळाच्या बाहेर एकूण १६ ट्रकची रांग दिसून आली होती. यासंदर्भातले सॅटेलाईट फोटोही व्हायरल झाले होते. पण हल्ल्यांनंतर हे ट्रक अचानक गायब झाल्यामुळे त्यातूनच युरेनियम हलवण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121