'२०२४'च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानांचे जी-२० प्रतिनिधींना आमंत्रण!

    22-Jun-2023
Total Views | 51
Modi invites G20 delegates to India for 2024 general elections

नवी दिल्ली : 'अतिथी देवो भव' या तत्त्वावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २१ जून रोजी G-20 प्रतिनिधींना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारत भेटीसाठी आणि 'लोकशाहीचा उत्सव' पाहण्यासाठी आमंत्रित केले. गोव्यात दि. २१ जून रोजी झालेल्या G-20 पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात मोदींचा रेकॉर्ड केलेला हा संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी 'दहशतवाद देशाला तोडते तर पर्यटन जोडते', असे अधोरेखित केले. पर्यटनाची परिवर्तनीय शक्ती विचारमंथनातून साकार होईल आणि ‘गोवा मॉडेल’ आणि सामूहिक प्रयत्न यात महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

२२ जून रोजी G-20 मंत्रिस्तरीय बैठकीच्या शेवटी 'गोवा फ्रेमवर्क आणि कृती आराखडा' वर मंत्रिस्तरीय संभाषण जारी केले जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताच्या G-20 अध्यक्षांचे ब्रीदवाक्य 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य असू शकते." त्यामुळे हे ब्रीदवाक्य लोकांना एकत्र आणू शकते,असे ही मोदी म्हणाले.तसचे 'दहशतवादामुळे फूट पडते, पण पर्यटनामुळे लोक एकत्र येतात. पर्यटनामध्ये जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. ज्यामुळे एक सुसंवादी समाज निर्माण होईल." तसेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, लोकशाहीची जननी असणाऱ्या देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. तरी आपण सर्वानी या काळात भारतात यावे. आणि या उत्सवाचे साक्षीदार व्हावे.
 
दरम्यान २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही टूर ऑपरेटर्सनी भारतात 'इलेक्शन टुरिझम' सुरू केले होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान विदेशी पर्यटकांच्या विविध गटांना वाराणसी आणि इतर ठिकाणी नेण्यात आले. मोदी वाराणसीतून लोकसभेवर निवडून आले आणि नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यावेळी त्यांनी G-20 देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींचे आभार मानले होते.


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121