जळगाव : अमळनेर येथे दोन गटांत राडा झाल्याने २ दिवस संचारबंदी करण्यात आली होती. दोन गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस चकमकीच्या ठिकाणी दाखल झाले. ९ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर शहरातील दगडी गेट परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली होती. दोन ते तीन तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि या वादाचे पडसाद उमटत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना अटक केली तर शंभर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच कलम १४४ अन्वये २ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.