बहुपत्नीत्वविरोधी कायद्यासाठी आसाममध्ये समिती स्थापन

    15-May-2023
Total Views | 92
sarma

नवी दिल्ली
: आसाम सरकारने बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी कायदा करण्यासाठी राज्य विधानसभेच्या वैधानिक क्षमतेचे परीक्षण करण्यासाठी चार सदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रूमी फुकन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये आसामचे महाधिवक्ता देबदीत सैकिया, अतिरिक्त महाधिवक्ता नलिन कोहली आणि गुवाहाटी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील नेकीबुर झमान यांचा समावेश आहे. ही समिती कायदा करण्यासाठी आसाम विधानसभेची वैधानिक क्षमता आणि कायद्याविषयीची अन्य आवश्यक पैलूंवर विचार करून दोन महिन्यात आपला अहवाल आसाम सरकारला सादर करणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी त्यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत राज्यातील बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी कायदा करणार असल्याची घोषणा केली होती. ही समिती मुस्लिम वैयक्तिक कायदा (शरीयत) ऍप्लिकेशन ऍक्ट, १९३७ च्या तरतुदींसह राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ सोबत समान नागरी संहितेसाठी राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांचे परीक्षण करणार आहे, असेही मुख्यमंत्री सर्मा यांनी म्हटले होते.

आसाममधील आणखी ३०० मदरसे बंद करणार – मुख्यमंत्री सर्मा

तेलंगणामध्ये एका रॅलीस संबोधित करताना मुख्यमंत्री सर्मा रविवारी म्हणाले की, आसाममध्ये 'लव्ह जिहाद' विरोधात मोहीम राबवून मदरसा शिक्षण बंद करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाच दिवसात ६०० मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी ३०० मदरसे बंद करण्यात येणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121