इंटरनेट शटडाऊनचे आर्थिक गणित

भारतात वर्षभरात ८४ वेळा सेवा बंद

    02-Mar-2023
Total Views | 71
India saw at least 84 internet shutdowns in 2022

नवी दिल्ली : विविध कारणांमुळे भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ८४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. यामुळे तब्बल साडेचार हजार कोटींचा आर्थिक फटका बसल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 
अहवालात दिलेलय माहितीनूसार जगभरात गेल्या वर्षभरात १८७ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यापैकी ८४ वेळा एकट्या भारतात इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. एकट्या जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ४९ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत सलग ६ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर राजस्थानमध्ये १२ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती तर पश्चिम बंगालमध्ये ७ वेळा इंटरनेट सेवा बंद होती.

२०२२ मध्ये ३५ देशांमध्ये किमान १८७ वेळा इंटरनेट शटडाऊन झाले. या ३५ देशांपैकी ३३ देशांमध्ये या हिंसाचाराच्या घटना वारंवार घडल्या. इंटरनेट शटडाऊनमुळे एखादी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे असामाजिक तत्वांना पायबंद घालता येतो. वाढत्या डिजिटल जगामध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते.

वर्षभरात ४५०० कोटींचा फटका

सन २०२१ मध्ये भारतात सुमारे ११५७ तास इंटरनेट सेवा ठप्प होती, यामुळे देशाचे जवळपास ४३०० कोटींचे नुकसान झाले आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार थांबतात. यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तसेच ५.९ कोटी लोकांना या सेवेपासून वंचित रहावे लागले होते. भारताव्यतिरिक्त युक्रेनमध्ये २२ वेळा आणि इराणमध्ये १८ वेळा इंटरनेट सेवा बंद झाली होती.

इंटरनेट सेवा बंद करण्याची कारणं


  • समाजात तेढ निर्माण करणार्‍या घटना रोखणे

  • संकट काळात चुकीच्या माहितीचा प्रवाह रोखणे

  • हिंसाचार, आंदोलनाच्या घटनांवर नियंत्रण

  • इंटरनेट शटडाऊनमध्ये सर्व प्रणाली ठप्प होतात
     
  • वाढत जाणारा तणाव नियंत्रणात आणणे

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121