दिल्लीपासून धर्म विवेचन आणि प्रसाराची सुरुवात केलेल्या बरेलवीला आता दिल्ली बाहेर बोलावणे येऊ लागले. सहारानपूर, देवबंद, प्रयागराज, वाराणसी, लखनौ, कानपूर, सुलतानपूर अशा विविध ठिकाणी बोलावणे येऊ लागले. प्रत्येक ठिकाणी बरेलवी वहाबी विचार सांगत असे. धर्मप्रसार हे प्रत्येक मुसलमानाचे प्रथम धार्मिक कर्तव्य होय. यासाठी जे काही करणे आवश्यक असेल ते करण्यात काहीही पाप नाही. हे कार्य करण्यात जर लढाई वा हत्या घडली तरीही मुसलमानांना सरळ जन्नतमध्ये प्रवेश मिळतो, अशा प्रकारची शिकवण बरेलवी देत असे.
समाज इतिहास लक्षात ठेवतो, त्यापासून शिकतो, स्वत:मध्ये सुधारणा करतो, त्यालाच इतिहास नेहमी साथ देतो. भारतीय वायू दलाने २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोट येथे ‘एअर स्ट्राईक’ केला. पुलवामा आत्मघातकी हल्ल्याला भारताने दिलेले ते उत्तर होते. बालाकोट हवाई हल्ल्यात अनेक अतिरेकी मारले गेले. बालाकोटला इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. याआधीदेखील १८३१ मध्ये शेर सिंगांच्या नेतृत्वाखाली शीख सैन्याने बालकोटच्या लढाईत सय्यद अहमद शाहीद बरेलवीचा सपशेल पराभव केला होता. या लढतीत बरेलवी स्वतः मारला गेला होता. पण, हा बरेलवी कोण, त्याची भारतीय मुस्लीम समाजाची मानसिकता घडवण्यात भूमिका काय, हे प्रत्येक हिंदू माणसाने समजून घेणे आवश्यक आहे.
धर्म कोणताही असो, काळाच्या ओघात, ज्या ज्या प्रदेशात त्याचा प्रसार होऊ लागतो, त्या त्या प्रदेशातील काही विचार, प्रथा, चालीरिती यांची त्यात सरमिसळ होतच असते. पण, ‘वहाब’चा इस्लाममध्ये मिसळल्या जाणार्या भारतीय अध्यात्मिक चेतनेला (सुफी विचार)विरोध होता. त्यामुळे इस्लाममध्ये शिरकाव झालेल्या या अयोग्य गोष्टी काढून टाकण्याचा, इस्लामला शुद्ध स्वरूपात आणण्याचा त्याचा विचार होता. तो आपल्या धार्मिक प्रवचनांद्वारे मूळ इस्लामिक शिकवणीचा हिरिरिने प्रसार करीत असे. वहाबी शिकवण दहेलवीने पुढे नेली. पण, वहाबी पंथाचा प्रचार, प्रसार आणि नेटवर्क स्थापित करण्याचे काम मात्र सय्यद अहमद शाहीद बरेलवीने (१७८६-१८३१) केले. याचा जन्म रायबरेली येथे झाला. त्यामुळे याला अनेक जण सय्यद अहमद बरेलवी म्हणून ओळखतात. हा बरेलवी मुहम्मद पैगंबरांच्या घराण्यातील हसनचा ३६वा वारस मानला जातो. या बरेलवीला दहेलवीच्या मुलाचा आश्रय मिळाला.
कालांतराने अब्दुल अजीज दहेलवीनेच बरेलवीला आपल्या भावाकडे (अब्दुल कादीरकडे) पुढील अभ्यासासाठी पाठवले. या सगळ्या प्रशिक्षणामुळे बरेलवी थोड्याच दिवसात एक प्रमुख इस्लामिक अभ्यासक आणि विवेचक ठरला. काही काळ तो उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे वास्तव्य करून राहिला. परंतु ,एका बाजूला महाराजा रणजित सिंह आणि दुसर्या बाजूला इंग्रज यांच्या प्रभावामुळे बरेलवीला इस्लामचा प्रचारक म्हणून गुजराण करणेदेखील अवघड झाले. तेव्हा तो पुन्हा दिल्लीत परतला. दहेलवी आपल्या संबोधनातून मुसलमानांना मूळ मुहम्मद पैगंबरांच्या मार्गावर चालण्याचा आग्रह धरत असे. तसेच, भारतीय वा इराणी प्रथा परंपरा सोडून देण्याचे प्रतिपादन करत असे. यात तो सुफी शिकवणीचा धिक्कार करीत, ती शिकवण सोडून देण्याविषयी परखड आणि आग्रही प्रतिपादन करत असे. सुफी शिकवणीचा किंवा सुफी पंथाचा धिक्कार याचा अर्थ, बंधुभाव, धार्मिक उदारता, इतर धर्मांचा सन्मान आणि गंगा-जमुना तहजीबसारख्या संकल्पनाचा धिक्कार होय. हीच शिकवण बरेलवी आपल्या भाषणांमधून मुस्लीम समुदायाला देत असे.
दिल्लीपासून धर्म विवेचन आणि प्रसाराची सुरुवात केलेल्या बरेलवीला आता दिल्ली बाहेर बोलावणे येऊ लागले. सहारनपूर, देवबंद, प्रयागराज, वाराणसी, लखनौ, कानपूर, सुलतानपूर अशा विविध ठिकाणी बोलावणे येऊ लागले. प्रत्येक ठिकाणी बरेलवी वहाबी विचार सांगत असे. धर्मप्रसार हे प्रत्येक मुसलमानाचे प्रथम धार्मिक कर्तव्य होय. यासाठी जे काही करणे आवश्यक असेल ते करण्यात काही ही पाप नाही. हे कार्य करण्यात जर लढाई वा हत्या घडली तरीही मुसलमानांना सरळ जन्नतमध्ये प्रवेश मिळतो, अशा प्रकारची शिकवण बरेलवी देत असे. धार्मिक प्रवचनाच्या निमित्ताने त्याने उत्तर भारतात केलेल्या प्रवासाने त्याला पुढील गोष्टी लक्षात आल्या.
१. या देशातील सत्ताधारी मुस्लीम (नबाब, जहागीरदार, जमीनदार)हे अत्यंत ऐशोआरामात जीवन जगत आहेत.
२. या सत्ताधारी वर्गाला काहीही करून फक्त आपली सत्ता आणि संपत्ती राखण्यातच रस आहे.
३. त्यामुळे अनेक गोष्टींबाबत ते तडजोड करण्यासाठी तयार होतात. अनेक गोष्टींकडे डोळेझाक करतात.
४. धर्मप्रसार आणि साधी जीवनशैली या पैगंबरांनी सांगितलेल्या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींकडे हा समाजाचा वरचा वर्ग डोळेझाक करतो आहे. त्यामुळे ते सच्चे मुसलमान नाहीत.
५. म्हणून धर्मप्रसारासाठी समाजातील वरच्या स्तरावरील मुसलमान निरूपयोगी आहे. या कामासाठी सर्वसामान्य मुस्लीम माणसांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सर्वसामान्य मुसलमान माणसाची जिहादसाठी मानसिकता तयार केली पाहिजे. हा विचार घेऊन त्याने मुस्लीम समाजातील खालच्या जातींवर (अजलफ आणि अरजल) लक्ष केंद्रित करून त्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाला नैसर्गिकरित्या उग्र स्वभावी असणे आवश्यक आहे, हेही तो आपल्या प्रवचनांमध्ये सांगू लागला आणि लोकांना ती उग्रता प्रत्यक्षात दिसावी म्हणून तो स्वतः नेहमीच हत्यारबंद राहू लागला. १८२२ मध्ये दुसर्यांदा हजयात्राकरून आल्यावर पंजाब प्रांतात मुस्लीम कमजोर झाल्याचे पाहून त्याने हैदराबादच्या निजाम, हेरथचा राजा कामरान आणि बुडाला येथील अमीराला पुन्हा मुस्लीम समाज प्रबळ करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला पठाणांचा मिळालेला प्रतिसाद आणि मुस्लीम देशांशी असलेली भौगोलिक जवळीक लक्षात घेऊन, त्याने वायव्य सरहद्द प्रांतात स्थलांतर केले. तेथे देखील त्याने, मुहम्मद गझनीच्या थडग्याच्या परिसरात आपला डेरा टाकला. तेथून अतिरेकी शिकवण आणि आपल्या हालचाली त्याने सुरू केल्या. १८३१ मध्ये बालाकोटच्या लढाईत शीख सैन्याने त्याच्या सैन्याचा संपूर्ण पराभव केला, तो स्वतः त्या लढाईत मारला गेला.
कट्टर वहाबी विचारांच्या बरेलवीला इस्लामसाठी अधिक जमीन आणि संपत्ती हवी होती. सर्व जग फक्त मुस्लिमांसाठी आहे. इतर धर्मीयांना (अश्रद्धांना) या जगात जागा नाही. त्यांनी एक तर मृत्यू पत्करावा अथवा मुसलमान व्हावे. फक्त इस्लाम धर्मच लोकांना योग्य मार्गावर ठेवू शकतो. इस्लामदेखील फक्त त्याच्या मूळ स्वरूपातच अनुसरला पाहिजे. धर्मप्रसारासाठी अश्रद्धांच्या कत्तली केल्या, त्यांच्यावर अत्याचार केले तरी अल्ला त्याकडे धर्म सेवा म्हणूनच पाहतो. त्यामुळे अश्रद्धांचे (हिंदूंचे) निर्दालन केल्यास जन्नत (स्वर्ग)मिळतो. हे मुसलमानांना सांगणार्या बरेलवीचे सगळ्यात मोठे काम म्हणजे त्याने वहाबी विचारधारेचे निर्माण केलेले संपर्क जाळे होय. वायव्य सरहद्द प्रांतात मनुष्यबळ, निधी आणि शस्त्रे यांचा सतत पुरवठा व्हावा यासाठी त्याने त्या काळात अतिशय परिणामकारक नेटवर्क स्थापित केले. त्यासाठी पटना शहर प्रमुख केंद्र ठेवून भारतात अनेक दुय्यम केंद्रे स्थापित केली. ज्याद्वारे या कार्याला बंगाल, मुंबई, बिहार, दक्षिण भारतातूनदेखील निधी आणि मनुष्यबळाचा पुरवठा होत राहावा.
अनेक प्रार्थनास्थळांवर जकात गोळा करून ती पटना येथे पोहोचवली जात असे. तेथून तो निधी वायव्य सरहद्द प्रांतात पाठवण्याची एक व्यवस्था बरेलवीने निर्माण केली. बरेलवीच्या मृत्यूनंतरदेखील उत्तर भारतातील अनेक मुस्लीम कुटुंब आपल्या उत्पन्नाचा एक भाग या जिहादसाठी जकात म्हणून देत असत किंवा कुटुंबातील एखादा सदस्य या जिहादसाठी पाठवत असत. हीच पद्धत वापरून आजही ‘आयआयएस’साठी काही कुटुंबातून एकतरी तरुण पाठवण्यात येतो. वहाबी पंथ इस्लाममध्ये कोणत्याही स्थानिक प्रथा परंपरा यांची सरमिसळ होऊ नये म्हणून मुसलमानांना इतर धर्मीयांच्या संपर्कातच येऊ नका, असे सांगतो. परिणामी, एक मुस्लीम गट, अगदी आजही इतर लोकांपासून आपोआपच वेगळा होतो आणि जिहादी विचारांवर, तसेच सर्व जगात फक्त इस्लाम हा एकमेव धर्म अस्तित्वात राहील, या सिद्धांतावर श्रद्धा असणारा उरतो. म्हणजे इतर धर्मीयांनी कितीही उदारता दाखविली, धर्म सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले तरी ते कुचकामीच ठरणार, हे निश्चित. १८५७च्या बंडामध्येदेखील वहाबी पंथ इतर बंड करणार्यांच्या तुलनेत अधिक संघटित असूनही, त्यांचे उद्दिष्ट वेगळे असल्यामुळे आणि त्यात हिंदूंना सहकार्य करणे बसतं नसल्याने सामीलच झाला नाही. (क्रमशः)